कैसा ये रिश्ता भाग 3

रिषभ हा रिया वर एकतर्फी प्रेम करत असतो तर प्रिया रिषभ वर प्रेम करत. प्रिया ही स्वभावने खुप शांत आणि समंजस असते. रिया व रिषभ याचे नेहमी काही ना काही कारण काढून भांडण सुरूच असते. रिषभ हा स्वभावाने अत्यंत प्रेमळ असतो. त्यामुळे तो लवकरच रियाच्या घरच्याना आवडायला लागतो. प्रिया ही ऑफिसमध्ये तिच्या काकांना मदत करत असते.त्यामुळे ती रिषभला रोजच्या रोज ऑफिस मध्ये भेटते. रिषभ ही प्रियाला ऑफिसमध्ये अनेक वेळा मदत करतो.त्यामुळे तो प्रियाला जास्तच आवडायला लागतो. तयाला माञ या सगळ्याची कल्पना नसते. लवकरच प्रिया व रिषभ याच्यांत खुप चांगली मैत्री होते. दोघेही एकमेकांना सगळे शेअर करत असतात.
एकदा रिया बाहेर गेलेली असते.खुप दुर गेल्यवर तिची गाडी खराब होते. ती आजुबाजुला मदतीसाठी बघते. पण तेथे कुणीच नसते. ती खुप वेळ मदतीसाठी कुणी तरी येईल याची वाट पाहत असते याच दरम्यान रिषभ तेथून जात असताने त्याला तिची गाडी दिसते.त्यामुळे तो थांबतो व तिला काय झाले. इथे का थांबवलीस अशी विचारणा करतो. ती त्याला गाडी खराब झाली अस सांगते.तेव्हा तो तिला लिफ्ट ऑफर करतो.पण ती त्याला त्याच्या सोबत जाण्यास नकार देते.तो तिला सांगतो या साईटवर जास्त कुणी येत नाही तुला दुसरी मदत मिळणार नाही म्हणून माझ्या सोबत चल म्हणतो. पण ती तयार होत नाही. त्यामुळे तोही तिच्या सोबत तिथेच थांबतो. खुप वेळ निघून जातो कुणीही येत नाही. तिला कळून चुकते. आता याची मदत घ्यावीच लागेल. ती त्याला साॅरी म्हणून घरापर्यंत सोडायला सांगते. तो काहीही न बोलता तिला घरी सोडतो.आपण मदत नाकारली तरीही हा आपल्यासाठी थांबला,मदत केली हा त्याचा स्वभाव आवडतो.तिला जाणीव होते, कि हा चागला असून ही आपण याच्यशी भांडतो. ती त्याच्याशी मैत्री करायची ठरवते.
दुसर्या दिवशी रिषभ घरी आल्यावर रिया त्याला फुलांचा गुच्छ देते व साॅरी म्हणते. आज पासून आपण चांगले मित्र बनू.तो तर अगोदरच तिच्या प्रेमात पडलेला असतो. तो पटकन हो म्हणतो. दोघेही मिञ झाल्यावर सोबत फिरू लागले. एकमेकांबरोबर वेळ घालवत होते. रियाला देखील तो आवडू लागला. तो तिला प्रपोज करायचे ठरवतो. तो एका दिवशी तिला बाहेर घेऊन जातो.व प्रपोज करतो.ती ही त्याला हो म्हणते .त्यानंतर दोघेही एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देत होते. आवडीनिवडी जाणून घेत होते. इकडे प्रिया देखील त्याच्या प्रेमात आहे, हे दोघानाही माहिती नसते.
प्रिया तिच्या काका काकीना तिच रिषभ वर खुप प्रेम आहे हे सांगते. हे तेथून जात असताने रिया ऐकते. तिला खुप दुख होते. पण ती काही तरी विचार करून रिषभ कडे जाते.व त्याला सगळे सांगते. व त्याला प्रिया सोबत लग्न करायला सांगते. तो तिला खुप समजावतो.आपण दोघं प्रेम करतो हे प्रियाला सांगू ती समजून घेईल आपल्याला पण ती काही ऐकत नाही रिषभला प्रिया सोबत लग्न कर अशी शपथ घालून तेथून निघून जाते.
दुसर्या दिवशी रियाचे मम्मी पप्पा आपल्या लाडक्या पुतणीचे स्थळ घेऊन रिषभकडे जातात.प्रिया देखील रिषभ होकार देईल की नाही हे बघण्यासाठी कुणाला ही न सांगता त्याच्या घरी येते व बाहेर उभी राहून सगळे ऐकत असते. प्रियाचे काका त्याला प्रिया विषयी सगळे सांगतात. तो चुपचाप सगळं ऐकून घेतो.तो एवढा शांत झालेला बघून ते त्याला काय झाले असे विचारतात. तो काहीच बोलत नाही. ते परत विचारतात. तेव्हा माञ तो त्याना सगळी परिस्थिती सांगतो. मी व रिया खुप प्रेम करतो. एकमेकांना सोडून राहू शकत नाही. रिया त्याला प्रियाशी लग्न करायला सांगून गेल्याचेही तो सांगतो. व प्रियाशी लग्न झाले तर तिघेही कसे खुश राहू शकणार नाहीत हे समजावून सांगतो. रीयाचया मम्मी पप्पा हे सगळे समजते.पण दोनीही त्याच्याच मुली असतात.त्याना काय बोलावे हेच कळत नाही. प्रिया हे सगळे ऐकत असते. तिला खुप रडायला येते मी ज्या मुलांवर प्रेम केले तो मुलगा माझ्या बहीणीवर प्रेम करतो. हे आपल्याला असे समजते.याचे तिला फार वाईट वाटले. ती खुप समजूतदार असते.ती थोडा वेळ विचार करून नंतर आत येऊन म्हणते मी तुमचे सगळे बोलणे ऐकले.रिषभ बरोबर बोलतो आहे .आम्ही तिघेही खुश राहणार नाही. तो रियावर प्रेम करत असताना माझ्यावर तेवढे प्रेम कधीही करू शकणार नाही त्यामुळे मला हे लग्न करायचं नाही. आपण रिषभ व रियाचेच लग्न लावून देऊ.प्रियाच्या या वागण्याचा तिच्या काका काकीना खुप अभिमान वाटतो. नंतर ते घरी येतात.
दुसरया दिवशी रिषभ आल्यावर त्याला रियाचे आजी आजोबा, मम्मी पप्पा त्याच्या कुटूंबाची माहिती विचारतात.तो काहीच बोलत नाही त्याला काय सांगावे हे कळत नाही. तो बाहेर निघून येतो.त्याच्या मागे रिया देखील येते.ती त्याला काय झाले हे परत परत विचारते. तो तिला सगळ सांगतो. तो घरून पळून आश्रमात रहात होता हे देखील सांगतो. हे सगळे ऐकल्यावर रिया त्याला समजून घेते.व मला ऐवढी मोठे कुटूंब असताना त्याना सोडून रहायला व लग्न करायला नाही आवडणार अस सांगते. ती खुप हट्ट करते.त्यामुळे त्याचा नाईलाज होतो व तो त्याच्या मम्मी व आजीला फोन करून पुण्याला रियाचया घरी बोलावतो. त्या लगेच येतात.त्याला भेटून त्याना खुप आनंद होतो. कितेक वर्षानी ते भेटलेले असतात.नंतर तो रियाचया कुटूंबाची ओळख करून देतो.त्याच्या मम्मीला रिया खुप आवडते.माञ त्याच्या आजीला तिचा बिनधास्तपणा आवडत नाही पण तिच्या मुळे आपला नातू आपल्याला परत भेटला म्हणून त्याही लग्नाला समंती देतात.मात्र तो त्याच्या आजीला पप्पांना या लग्नापासून दुर ठेवायला सांगतो. हे रिया ऐकते पण ती काहीच बोलत नाही उलट ती त्याच्या पप्पांना फोन करून घरी बोलावून घेऊन दोघांनाही समोरासमोर उभे करून त्यांच्यातील गैरसमज दूर करते.दोघानाही आपली चुक समजते. ते एकञ येतात. जे कुणालाही जमले नाही ते रियाने करून दाखवले.त्यामुळे ती लग्नाअगोदरच सगळ्याची लाडकी बनते. व लग्नाची तयारी धुमधडाक्याने सुरू होते. दोन्ही कुटूंबिय श्रीमंत  असल्याने वारेमाप खर्च सुरू असतो.
                                         क्रमशः


टिप:कैसा ये रिश्ता भाग 2कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/2_18.html

कैसा ये रिश्ता भाग 3कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/3_20.html

कैसा ये रिश्ता भाग 4 कथा खालील लिंक वर क्लिक करा. 
https://aayubhagwat.blogspot.com/2020/04/4.html



Zatpat recipes marathi नक्की subscribe करा. 

Comments

Popular Posts